मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, September 18, 2012

.. निरोप


काही मानसं सोडून जातात कायमच्यासाठी,
फक्त त्यांच्या आठवणी उरतात निरोप देणार्याच्या हाती.
 
पण जाताना ते करतात अश्रूंनी वाट ओली,
त्याच वाटेवर अंकुर फुटतात आशेचे,
आणि सांगतात पुन्हा होईल  भेट आपुली.
 
जाणारा जाताना, ओल्या डोळ्यांनी,
निरोप देणाऱ्याची सामोरी मूर्ती साठवतो.
निरोप देणारा मात्र निरोपाच्या नंतर जाणाऱ्याची,
पाठमोरी आकृती वारंवार मनी आठवतो.
 
दोघांच्याही मनातला तो एकाच घाव असतो,
आणि एकांतात त्यातूनच वाहणारा विरहाचा स्त्राव असतो.
 
जाणारा मग एकदा तरी वळून बघतो पाठी,
मग पुन्हा निरोप होतात पुन्हा कधी न भेटण्यासाठी.
निरोप देणारा वेळ, वार, तारीख सारं विसरून जातो,
तो क्षण मात्र पुन्हा पुन्हा डोळ्यात तरळून राहतो.

.................अमोल

No comments: