लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचे |
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचे |
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जाते |
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देते|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकीच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|
लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचे |
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचे
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकीच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|
लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचे |
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचे |
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून ताई आशीर्वाद दे म्हणाला|
थोरली असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|
कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येते|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मैत्रिणीचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मैत्रिणी व मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|
जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडते|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो
Monday, September 17, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment