मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Friday, January 12, 2018

*स्नानाचे महत्व*

*स्नानाचे महत्व* 

_🚩स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे._
_सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खावु पिउ नये. जितके महत्व शास्त्रात मंत्र आणि नामस्मरणाला आहे, तितकेच महत्व  स्नानाला  सुद्धा आहे._

_🚩अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेलाच झाली पाहिजे._

🚩 *ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे, 4 ते 6.*
🚩 *मनुष्याची अंघोळ म्हणजे,    6 ते 8.* 
🚩 *राक्षसांची अंघोळ म्हणजे     8 ते 10.* 
🚩 *प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12.*
🚩 *त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.*

🚩 *ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.* 

_ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि  मनुष्याला एक वेगळाच उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते. मानसीक ताकद वाढते._

🚩 *6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.* 

_ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्यासारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो. पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही. फक्त मनुष्य सर्व बाबतीत सम प्रमाणात असतो. सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते._

*🚩राक्षसांची अंघोळ 8 ते10*

_ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर लोभ जास्त स्वरुपात मनुष्यात येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात. अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो._

*🚩प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12*

_ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते. काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपुन राहणे, खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही. तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही._

_‼तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे.‼_

_तरच त्याची शक्ति मिळेल._ 

_म्हणून मनुष्याने_
_‼कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे.‼_

_स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण ♦स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे.♦_

_तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग विवीध आजारांना आमंत्रणच होय._

_🚩कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. आणि_

*♦आपणही ते जपलेच पाहिजे♦*

No comments: