मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Wednesday, February 9, 2011

सांग आठवण आली की काय करायचे?

नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोण समजावयाचे?
सांग आठवण आली की काय करायचे?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सांग आठवण आली की काय करायचे?

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

फोन मात्र मीच करायचं,
How.....R... U मात्र तू बोलायचे,
तु दिसलास की डोळे भरून पहायचे,
ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

No comments: