मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, January 6, 2011

पटकन "सॉरी' म्हणायला शिका; "इगो' सोडून द्या

पटकन "सॉरी' म्हणायला शिका; "इगो' सोडून द्या


>दोनभिन्न व्यक्ती, भिन्न वातावरणात वाढलेल्या, त्यांच्या आवडीनिवडी, सवयीहीवेगवेगळ्या; पण दोन-तीन भेटींतच सगळे आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतात.मग आनंदी व उत्साही वातावरणात, अखंड प्रेमात बुडालेले ते दोन जीवलग्नाच्या बंधनात बांधले जातात. "ऍरेंज्ड्मॅरेज' असो वा "लव्ह मॅरेज';दोघे ओळखीचे असोत की अनोळखी, जेव्हा ते सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हाचखरी ओळख होते. लग्नानंतर नवीन नाती, नवीन माणसे या सगळ्या नव्या नवलाईतपहिली काही वर्षे भुर्रकन उडून जातात; पण हाच काळ खूप महत्त्वाचा असतो.एकमेकांना समजून घेण्यासाठी. अगदी छोट्या छोट्या सवयींपासून स्वभावापर्यंतसगळे हळूहळू उलगडत जाते. एकमेकांचे सूर जुळतात. संसाराचा पाया तयार होतो.एक अतूट नाते तयार होते. समोरची व्यक्ती ही आपली आहे, ती जशी आहे, तशी(गुण-दोषांसकट) तिला स्वीकारता आले पाहिजे. लग्नानंतर एक-दोन वर्षे नवलाईटिकून असते. मग दोघांच्याही नकळत बदल घडतात. ही तीच व्यक्ती आहे का, अशाप्रश्न पडावा इतपत बदल घडतात! का परिस्थिती बदलते? नेमके काय होते कुणासठाऊक! तिच्याशी बोलण्यास, भेटण्यास कायम तत्पर असणारा "तो' अचानक बिझीहोतो. तिचा फोन येताच, "घरी यायला उशीर होणार आहे,' किंवा "पाच मिनिटांनीफोन कर' इत्यादी सांगतो. तिच्यासाठी वाट्टेल तेवढे महागाचे गिफ्ट घ्यायला,तिला सरप्राईज द्यायला आतूर असलेला "तो' तिच्याबरोबर जाताना आधी पाकीटतपासून पाहतो. "ती'सुद्धा काही कमी नसते. त्याचासाठी नवनवीन पदार्थबनवणारी "ती' आता त्यालाच फोन करून सांगते "येताना पार्सल घेऊन ये' किंवा"पोहे खाशील का?' "घरी कधी येणार?' "कुठे आहेस?' इत्यादी. नेमके कायझालेले असते? इतका बदल कशामुळे झालेला असतो? उत्तर सोपे आहे ः जबाबदाऱ्यावाढल्या की प्रायॉरिटीज्ही बदलतात. संसार म्हटले की, "भांडण' आलेच; पणरागात कोणी काही बोलले तर ते सोडून देता आले पाहिजे.
>"मी, माझे, माझी माणसे' हे सगळे गळून पडले पाहिजे व आपुलकीची भावना निर्माणझाली पाहिजे. अर्थातच यात दोघांचाही समप्रमाणात सहभाग असेल तरच हे शक्यआहे.
>संसार सुखी करायचा असेल तर "सप्तपदीचे सात मंत्र' दोघांनीही अमलात आणावेत.
>1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास आदर बाळगा
>2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा
>3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.
>4)स्वतःसाठी वेळ द्या. (छंद जोपासा. मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ घालवा.स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करा). एकमेकांना मोकळीक द्या; तरचस्वातंत्र्याचा खरा अर्थ उमजेल.
>5) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)
>6) पटकन "सॉरी' म्हणायला शिका व "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा, पैशाचा, पदाचा इत्यादी)
>7)प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्याप्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या(उदाहरणार्थ ः आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)
>संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल. मग दिवसभर कुठेहीअसा; संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल; पण तरीही वाढत्याजबाबदाऱ्यांचे व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवरउमटणारच. कधीतरी वाद होणारच; पण त्यांचे प्रमाण असेल "जेवणातल्यामिठाएवढेच!'

No comments: